Share

महापोर्टल बंद करून नालायक ठाकरे सरकार विद्यार्थ्यांना विसरले, नीलेश राणेंची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नोकरभरतीमधील भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी फडणवीस सरकारने सर्व प्रशासकीय विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील पदभरती महापरीक्षा पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या पोर्टमध्येच मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे पोर्टल बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे पोर्टल बंद करुन लवकरच नवीन पोर्टल सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र निर्णयाला वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला असून ठाकरे सरकार विद्यार्थ्यांची प्रतिक्षा विसरले असल्याचा आरोप भाजप नेते नीलेश राणे यांनी केला आहे.

सरकारी नोकर भरतीसाठी फडणवीस सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले महापोर्टल ठाकरे सरकारने अखेर बंद केले होते. तसेच नव्या पोर्टलसाठी निवीदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय देखील घेतला होता. त्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मागणी केली होती. तसेच हे महापोर्टल बंद व्हावे यासाठी विविध विद्यार्थी संघटनांनी देखील निवेदने दिले होते.

फेब्रुवारी २०२० मध्ये बंद करण्यात आलेले पोर्टल अद्याप सुरू करण्यात आलेल नाही. त्यामुळे नीलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘महापोर्टल बंद करून नालायक ठाकरे सरकार विसरलं की, विद्यार्थी जवळपास दीड वर्ष नवीन प्रणालीची वाट बघतायत.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!