जालना : भोकरदन तालुक्यातील मालखेडा येथे रविवारी (दि.१६) पहाटे सुमारे पाच वाजेच्या दरम्यान एका प्रेमी जोडप्याने एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नववधू स्नेहा राजू आव्हाड या युवतीच्या अंगावर हळद लागलेली असताना लग्नाच्या दिवशीच आपल्या प्रियकरासोबत गळफास घेऊन दोघांनीही आपली जीवन यात्रा संपवली.
नवनाथ सुरेश गायकवाड (२१) व स्नेहा राजू आव्हाड (१८) या दोघांनी गळफास लावून घेत आपला जीवनप्रवास संपवला आहे. लग्नाच्या दिवशीच एका प्रेमी जोडप्याने गळाफास घेतलाने एकच खळबळ उडली आहे. एकीकडे प्रेम प्रकरण तर दुसरीकडे घरच्यांचा विवाहासाठी आग्रह होत असल्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मालखेडा येथे नवनाथ गायकवाड या तरुणाचा टायर पंक्चरचा व्यवसाय होता. नवनाथ याचे त्यांच्याच नात्यातील स्नेहा राजू आव्हाड या तरुणी सोबत वर्षभरापासून प्रेम संबंध जुळले होते. आज दुपारी स्नेहाचा विवाह तालुक्यातील कोळेगाव येथील शुभम संतोष साळवे या तरुणाशी पार पडणार होता. मात्र विवाहाच्याच दिवशी स्नेहा ही नवनाथ सोबत पळून गेली. कोळेगाव येथून पहाटे दोघेजण मालखेडा येथे आले. त्याठिकाणी असलेल्या नवनाथ याच्या वडीलांचे जुने घर आहे. दोघांनी याठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणूनच फडणवीस असे उद्योग करतायत’
- सावधान ! चक्रीवादळामुळे उद्या रायगडमध्ये रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट
- वाहन चोरट्यांचा धुमाकुळ, तीन दुचाकी लांबवल्या
- पुणे सावरतंय ! आज कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट
- भंगारचे गोडावून फोडणाऱ्या टोळीच्या पोलिस कोठडीत वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

