नांदेड: सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जिल्ह्यात वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण सर्वात प्रभावी योजना आहे. लसीकरण हाच त्यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शासनाने देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोकसंख्या ३१ लाख ८७ हजार ७८५ तर शहराची लोकसंख्य ६ लाख ७७ हजार ३४५ इतकी आहे. ग्रामीण भागात २ लाख ५५ हजार ४३ तर नांदेड शहरात ६० हजार २१४ असे एकूण ३ लाख १५ हजार २५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोना संकटावर आता लसी उपलब्ध झाल्या आहेत. या लसीकरणाच्या माध्यमातून आपण सर्वांचे सहकार्य व पाठबळ आवश्यक आहे.
लसीकरणात लस घेतलेल्या नागरीकांपैकी एकही जण दगावल्याची नोंद जिल्ह्यात झालेली नाही. मात्र,लस घेतल्यनंतर काही जणांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये प्रामुख्याने लसीकरणानंतर मास्क न वापरणे, बेफिकीरपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना न करणाऱ्यांचा समावेश आहे. तथापि, गंभीर कोरोना होण्यापासून लसीकरण झालेल्यांचा बचाव झाला आहे, असे प्राथमिकत: निदर्शनास आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरं देईन’
- आखेरच्या चेंडुपर्यंत रंगलेल्या सामन्यात एका धावेने आरसीबीने दिल्लीवर केली मात
- रुग्णालयातील अग्नितांडव थांबेना;मुंब्रा येथे चार रुग्णांचा होरपळून मृत्यू
- परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या
- महिलेचा नातेवाईकाकडून विनयभंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

