Share

गोलंदाजांचे ‘हे’ अपयश टीम इंडियाला पडणार महागात?

Published On: 

मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्युझीलंड संघाचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावात ६४ धावांची मजल मारली आहे.

या सामन्यात न्युझीलंडचा अर्धा संघ १३५ धावांवर माघारी परतला होता. त्यावेळी न्युझीलंडचा डाव लवकर संपुष्टात आणून भारतीय संघाला आघाडी घेण्याची चांगली सुवर्णसंधी होती. मात्र नेहमीप्रमाणे प्रतिस्पर्धी संघातील तळाच्या फलंदाजानी भारतीय गोलंदाजाना त्रास दिला. न्युझीलंडचे तळाचे फलंदाज कायली जेमीसनने २१ आणि टीम साऊदीने ३० धावांची खेळी करत संघाच्या धावसंख्येत तब्बल ५१ धावांची भर घातली. या धावांच्या जोरावर न्युझीलंडला पहिल्या डावात ३२ धावांची निर्णायक आघाडी मिळवता आली.

तर एकीकडे भारताच्या डावात तळाचे फलंदाज केवळ आठ धावांची भर घालु शकले. प्रतिस्पर्धी संघाच्या तळाच्या फलंदाजाना बाद करण्यात भारतीय गोलंदाज नेहमीच अपयशी ठरले आहे. आणि यामुळे अनेक सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली. हीच चुक डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाला महागात पडु शकते. पाचव्या दिवसाअखेर भारताकडे ३२ धावांची आघाडी आहे. अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजाच्या खेळीवर सामन्याचा निकाल अवलंबुन आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!