टीम महाराष्ट्र देशा – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर नगरपालिका निवडणुकीतही भाजपने तृणमुल काँग्रेसचा दारूण पराभव केला आहे.मंगळवारी भाटपारा येथे झालेल्या निवडणुकीत भाजपने २६ पैकी २६ जागा जिंकल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर भाटपारा नगरपालिकेची निवडणूक भाजप आणि तृणमुलसाठी प्रतिष्ठेची झाली होती. आतापर्यंत भाजपने पश्चिम बंगालमध्ये एकाही नगरपालिकेवर झेंडा फडकवला नव्हता. पहिल्यांदाच भाजपची नगर पालिकेवर सत्ता आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
