मुंबई : आजपासून (११ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचे पाचवे पर्व सुरू होत असून दौर्यावर जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांच्या घरावरील हल्ला आणि मनसे-भाजपची परिस्थिती यावर भाष्य केले.
यावेळी बोलत असतांना जयंत पाटील म्हणाले की,‘मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला असेल म्हणूनच सध्या भाजपकडून मनसेचा फक्त वापर चालू आहे’, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, पुढे पवार साहेबांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अगदी खोलात जाऊन माहिती घेत असून योग्य ती कारवाई करत आहेत. पवार साहेबांच्या घरावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय आहे. त्यामुळे हा प्रकार घडवण्यामागे कोण होते हे शोधण्याची गरज आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
- राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक; अमित ठाकरेंची पोस्ट व्हायरल
- पाकिस्तानच्या रस्त्यांवर ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा!
- INS VIKRANT घोटाळा: किरीट सोमय्या गुजरातमध्ये असल्याची माहिती!
- राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “मी शेवटपर्यंत…”
- “सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नका”,मुंबई गुन्हे शाखेची मागणी


