मुंबई: गोवामधील प्रमोद सावंत सरकारवर गोव्याचे तत्कालिन राज्यपाल आणि सध्याचे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच कोरोना काळात गोवा भाजप सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह गडद करणाऱ्या घटना गोव्यात सातत्याने घडत आहेत. तरुण पिढी अमली पदार्थ, जुगाराच्या अधीन होत चालली आहे. गोव्याची परिस्थिती अशी गंभीर व बकाल झाली आहे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोव्यातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करणार, अशी थापेबाजी करीत आहेत. ‘सरकार तुमच्या दारी’ नावाचा एक पडेल प्रयोगही त्यांनी मध्यंतरी करून पाहिला. त्यामुळे गोव्याचे वास्तव झाकले जाईल, असे त्यांना वाटले असावे. वास्तविक भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
गोवा एका भयंकर दुरवस्थेच्या गर्तेत फेकले गेले आहे. ही ‘झाकली मूठ’ अशीच राहावी, यासाठी तेथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत वेगवेगळी स्टंटबाजी करीत आहेत. मात्र गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘सत्य’ कथन करून ही ‘झाकली मूठ’च आता उघड केली. भाजप सरकारच्या भ्रष्टाचारापासून कोरोना स्थिती हाताळण्यातील गलथान कारभारापर्यंत मलिक स्पष्ट बोलले आहेत. गोवेकर जनता तर रोजच त्याचा अनुभव घेत आहे. मलिक यांच्या ‘सत्य’कथनाने गोव्याची सर्वच पातळ्यांवर झालेली दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली इतकेच. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था केविलवाणी झालीये; शिवसेनेचा टोला
- भाजपच्या कार्यक्रमात गुंडांच्या सौभाग्यवतींची हजेरी; गदारोळ होताच चंद्रकांत पाटील म्हणाले, पास नव्हते!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

