मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन राणेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.
वरून सरदेसाई यांनी राणे घराण्यावर खोचक टीका केली आहे. ‘राणेंच्या घराची पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना माहितच आहे. ते काँग्रेसमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी देखील राणेंवर गंभीर आरोप केले होते. धमकावणे, मारहाण करणे यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर आहेत,’ असं टीकास्त्र सरदेसाई यांनी सोडलं आहे.
‘मला राजकीय आवड असल्याने मी या क्षेत्रात आहे. मात्र, माझी राजकीय कारकीर्द संपावी या हेतूने केवळ हे घाणेरडे आरोप नितेश राणेंनी केले आहेत. ते सगळे आरोप तथ्यहीन आहेत. त्यामुळेच मी त्यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करणार आहे. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर हे आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावेत. नाहीतर येत्या ७ दिवसात त्यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं,’ असा इशारा वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.
तर, ‘मला दहावीत ९१ टक्के गुण आहेत, बारावीत देखील उच्च श्रेणीसह पास झालो आहे. मुंबई विद्यापीठात मी सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलं अशा जगातील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात मी मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळवली. दोन वर्षात मिळणारी सिव्हिल डिग्री मी एका वर्षात पूर्ण केली आहे. अत्यंत साध्या व उच्च शिक्षित घराची मला पार्श्वभूमी आहे,’ असं सांगत त्यांनी सुरुवातीला आपली ओळख करून दिली.
आता वरून सरदेसाई यांनी आपली ओळख ज्यापद्धतीने करून दिली आहे त्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी वरून सरदेसाई यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ‘तुझ लग्न होत नसेल तर शादी डॉट कॉमवर जा, त्यासाठी पत्रकार परिषद कशाला घेतोस’ अस म्हणत नितेश राणे यांनी वरून सरदेसाई यांची खिल्ली उडवली आहे.
Dear @ShaadiDotCom
It seems this guy is looking for a girl to get married desperately n that’s why he has taken a press conference to tell his and his family’s credentials.. would request u to pls help him out!
Thanks https://t.co/Vwaznuika1— Nitesh Rane (@NiteshNRane) March 16, 2021
नितेश राणे यांनी कोणते आरोप केले होते ?
‘देशात आयपीएलचं आयोजन देशातील नवोदित खेळाडूंना वाव मिळावं यासाठी करण्यात येतं. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजी करणाऱ्यांचं लोकेशन व इतर माहिती असल्याचं सांगत छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या,’ अशी मागणी वाझे करत असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय.
‘वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना एका माणसाचा फोन जातो. तुम्ही सट्टेबाजांकडून एवढे पैसे मागितले. आमचं काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, अशी विचारणा या माणसाकडून वाझेंना केली जाते. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून वरुण सरदेसाई आहेत.’ असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.
पुढे त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यात काय काय बोलणं झालं याची माहिती घेण्यात यावी,’ असं आहेत. तसेच, ‘सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केला जात होता हे सांगण्याची गरज नाही,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किंवा सोनू निगमला विचारा’
- बँक ग्राहकांसाठी खुशखबर आता चेक क्लीअर होण्यासाठी लागणार नाही वेळ
- अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यासाठी मुळात अब्रू असावी लागते, निलेश राणेंचा घणाघात
- मुंबई इंडीयन्स सुर्यकुमार-ईशानला रिटेन करु शकत नाही, कारण…
- परस्त्री सोबत शॉपिंगला जाणे पडले महागात, भरबाजारात अदनानची आयशाने धुलाई केली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

