मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून आता भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षासाठी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी दिला आहे.
भाजपच्या या आरोपांवर आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना कामाच्या बळावर निवडणुका लढवते आणि जिंकते. गटनेत्यापासून नेत्यापर्यंत सर्वजण रस्त्यावर उतरून जनतेची कामे करतात. त्यामुळे कधीही निवडणुका घ्या, शिवसेना घाबरत नाही. कोरोना काळात देखील शिवसेनेनं मुंबईत चांगलं काम केलंय. त्यामुळे निवडणूक हरण्याचा प्रश्नच नाही, असे चोख प्रत्युत्तर मुंबईच्या महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिले.
‘कोरोना काळात मुंबईत शिवसेनेने चांगलं काम केलंय, निवडणूक हरण्याचा प्रश्नच येत नाही’ सांगतायत महापौर किशोरीताई पेडणेकर…
जनतेला ठरवू देत ताई. तुम्ही काम किती केलं आणि वसुली किती केली ते. मुंबईची तुंबई झाली की तुमचं पितळ उघडे पडेलच.कोरोना काळातले मृत्यूदेखील जनता विसरलेली नाही. pic.twitter.com/sPHk32f5ca— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 2, 2021
आता, पेडणेकरांच्या या दाव्याचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी समाचार घेतला आहे. ‘जनतेला ठरवू देत ताई…तुम्ही काम किती केलं आणि वसुली किती केली ते. मुंबईची तुंबई झाली की तुमचं पितळ उघडे पडेलच.कोरोना काळातले मृत्यूदेखील जनता विसरलेली नाही,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ‘डिसेंबरपूर्वी सर्वांचे लसीकरण, ही मोदी सरकारची लबाडीच’ ; ममता दीदींचा घणाघात
- पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये; आरक्षण रद्द होण्यास पवारच जबाबदार – पडळकर
- काळजी घ्या, बेफिकिरी नको ! पुण्यात नव्या कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ
- आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांच्या खात्यात राज्य सरकार ५ लाख रुपये जमा करणार !


