🕒 1 min read
मुंबई : अमरावती मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत चक्क शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षांची युती झाली आणि हे वृत्त राज्यभरात वाऱ्याच्या वेगाने पसरले. दोन भिन्न विचारांच्या पक्षांनी युती केल्यामुळे अमरावती मनपाच्या या निवडणुकीची चर्चा राज्यभर रंगत आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी शिवसेना आणि एमआयएमच्या या युतीवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत एक ट्विट करून शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ‘महाराष्ट्रातील दोन समविचारी पक्षांनी अमरावतीत युती करून निवडणुका लढवायच्या ठरवल्या आहेत… लवकरच शिववडापाव बरोबर शिवशिरखुर्मा ही राज्यातील जनतेला चाखायला मिळेल…’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रातील दोन समविचारी पक्षांनी अमरावतीत युती करून निवडणुका लढवायच्या ठरवल्या आहेत… लवकरच शिववडापाव बरोबर शिवशिरखुर्मा ही राज्यातील जनतेला चाखायला मिळेल… pic.twitter.com/Udqj3FeKNj
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 13, 2021
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणासोबतही जाणार !
एमआयएम पक्षाचे नेते व खासदार इम्तियाज जलील यांनी या युतीबाबत भाष्य केलं आहे. ‘अमरावती मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत एमआयएमची शिवसेनेसोबतची युतीची गोष्ट खरी आहे. पण स्थानिक पातळीवरील गणिते वेगळी असतात. यामध्ये वरिष्ठ स्तरावरील नेत्यांचा काही विषय नसतो. अमरावतीच्या या निवडणुकीत स्थानिक नेत्यांना शिवसेनेची मदत घेणे योग्य वाटले असेल, जेणेकरून विकासकामे करता येतील. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुणाशीही आघाडी करायची वेळ आली तर आम्ही नक्कीच ती आघाडी करण्यासाठी तयार आहोत. फक्त भाजप सत्तेत येऊ नये.’ असं जलील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना वाढतोय पण निर्लज्जपणे थुंकणाऱ्यांना आवर घालणार कोण ?
- सचिन वाझेंचे पाय खोलात; अंतरिम जामीन न्यायालयाने नाकारला
- २ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय; वीजबिल वसुलीवरून राजू शेट्टी भडकले
- मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधम बापाला ५ वर्षे सक्तमजुरी
- रश्मी ठाकरेंसह वायकरांवर गंभीर आरोप केल्यानंतर आता सोमय्यांना मानहानीची नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
