अहमदनगर : राज्यातील शेतकऱ्यांची वीज वितरणाच थकबाकी वाढली आहे. त्यावरुन महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. त्यातच ‘वीज वितरणाची थकबाकी भाजप सरकारमुळे वाढला आहे, असा आरोप ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे () यांनी केला होता. प्राजक्त तनपुरे यांच्या टीकेवर भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
तुमचं अपयश आणि पाप झाकण्यासाठी तुम्ही भाजप सरकारवर आरोप करत आहात. आता सरकार तुमचं आहे, तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का?, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी प्राजक्त तनपुरे यांना केला आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतीचे वीज कनेक्शन कापू नये, वीजबिलं माफ करावी ही मागणी करत शेकडो आंदोलकांच्या घोषणांनी संगमनेर शहर दुमदुमून गेले. गेल्या दोन वर्षापासून राज्यातील कोणताही घटक राज्य सरकाच्या कारभारावर समाधानी नाही. तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते तरी पूर्ण करा, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.
दरम्यान, सरकारला फक्त वसुली करायचे माहीत आहे. राज्यातील सामान्य जनतेशी यांना काहीही देणं घेणं नाही असा घणाघाती आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मिलिंद नार्वेकरांचे ट्विट ठाकरे सरकारच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे’
- मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख ना?- नारायण राणे
- मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ ट्विटचे देवेंद्र फडणवीसांकडून समर्थन
- भारताविरुद्धच्या पराभवावर न्यूझीलंडच्या कर्णधाराने व्यक्त केली निराशा
- मुंबई, पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून होणार सुरू


