पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडीची कस्टडी मिळाली आहे. या मुद्द्यावरून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच आता नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत आहे.
नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असल्याचे दिसत आहे. राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी मंत्रालयातील गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकंदरीतच राज्यातील राजकारण चांगलेच तापत असल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलनाला सुरुवात केली आहे. अनेकांच्या हातात, सत्यमेव जयते शेवटी खोटा नवाब जेलमध्ये, भ्रष्टाचारी आघाडी सरकारचा जाहीर निषेध, असे आशयाचे फलक झळकावून भाजप कडून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. आता या प्रकरणी नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘नवाब मलिक यांना झालेल्या अटकेत काही तथ्य नाही’ – जयंत पाटील
काय सांगता! ट्विटरवर धोनी , कोहली आणि रोहितच्या नावापुढे बकरीचे चिन्ह आल्याने चाहते आनंदित
“बांगलादेशातून मुली आणून मुंबईत वेश्याव्यवसाय…”; भाजप नेत्याचा नबाव मलिकांवर गंभीर आरोप
अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच होणार स्पष्ट? – वकील उज्ज्वल निकामांचे वक्तव्य
श्रीलंका मालिकेसाठी गंभीरचा सल्ला ; ‘या’ खेळाडूने पुजाराची जागा घ्यायला हवी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

