🕒 1 min read
मुंबई : 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आले आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. तर आता या अटकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी परमबीप सिंग आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
परमबीर सिंगला केंद्र सरकारचे अभय असल्यामुळे तो आज विदेशात लपून बसला आहे. भाजप किती खालच्या पातळीचा पक्ष आहे हे देशाच्या लक्षात आलं आहे. भाजप राक्षस गणाचा पक्ष आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
परमबीर सिंग ला केंद्र सरकारचे अभय असल्यामुळे तो आज विदेशात लपून बसलाय. भाजपा किती खालच्या पातळीचा पक्ष आहे हे देशाच्या लक्षात आलंय.
भाजपा राक्षस गणाचा पक्ष.— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 2, 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून गेल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्य सरकारने व्यक्त केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात अँटिलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमबीर सिंग अटकेपासून वाचण्यासाठी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देशमुखांच्या रुपाने आज ‘घोटाळा इलेव्हन’ची पहिली विकेट पडली, लवकरच टीम ऑल आऊट होईल’
- देशमुखांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अटक करण्यात आली; राष्ट्रवादीचा आरोप
- ‘मुन्ना झुंड में तो … आते हैं, शेर अकेला आता हैं’, महेबूब शेख यांचा भाजपाला टोला
- ‘सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोणला हजर केलं आणि १४ महिने झाले तरी… ‘, नवाब मालिकांचा घणाघात
- दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
