नवी दिल्ली : औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,’भाजपने नवीन शिवव्याख्याते निर्माण केले असून या संदर्भात आता भाजपनेच भूमिका स्पष्ट करायला हवी’, असे राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’असे वक्तव्य तर कुणी केले असते तर भाजपने आत्तापर्यंत रस्त्यावर उतरून गोंधळ घातला असता. परंतु आता त्यांच्याच राज्यपालांनी हे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावर भाजपने ताबडतोब भूमिका घेणे आवश्यक आहे,’ असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- विराट कोहलीचा के एल राहुल संबधी मोठा खुलासा म्हणाला ” आमच्यात कनेक्ट…”
- “या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा धोतर फेडू”, विनोद पाटलांचा इशारा
- Russia-Ukraine war : शांतता पुनर्प्रस्थापित व्हावी म्हणून दलाई लामा यांनी केली प्रार्थना
- राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
- “राजे स्वयंप्रकाशित होते”, राज्यपाल कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावर वडेट्टीवार संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

