सातारा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले आहे. मात्र अशात भाजपचे अनेक नेते हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा करत आहेत. आता ‘ठाकरे सरकारने एका वर्षात काय केलं? हे मला दिसले नाही. लोकांची दिशाभूल केल्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही आणि लवकरच भाजपचे सरकार सत्तेत येणार’ असल्याचा दावा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
साताऱ्यात पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पाहणीसाठी उदयनराजे भोसले पोवई नाक्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना पदवीधर निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.’ठाकरे सरकारमध्ये एक वाक्यता नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच भाजपचे सरकार सत्तेत येणार आहे, ते कसे येणार आहे, ते विचारू नका’ असं भाकीत पुन्हा एकदा उदयनराजे यांनी वर्तवलं आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आम्हाला पाडण्यात अजिबात रस नाही. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सर्वच आघाड्यांवर ते अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांचाच वजनामुळे पडेल, असे मत पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे.
तर दुसरीकडे एखादी गोष्ट अनैसर्गिक घडत असेल तर ती फार काळ टिकत नाही हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे हे सरकार अंतर्गत कलहामुळेच पडेल. या निवडणुकीच्या निमित्तानं हे कलह दिसून आले आहेत. त्यातूनच हे सरकार पडणार असून त्यासाठी आम्हाला काही करण्याची आवश्यकता नसल्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
‘मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू; शिवसेना हिंदुत्ववादीच!’
साताऱ्यात दोन्ही राजेंच्या विरोधात राष्ट्रवादी ठोकणार शड्डू!
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
सर्वोत्कृष्ट गीतकार उदित नारायण यांचा ६५ वा जन्मदिवस
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!


