🕒 1 min read
औरंगाबाद : केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी विरोधी असून केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयातीच्या घेतलेल्या निर्णयामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या किंमतीत झालेली घसरण ही केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे झाली असल्याची टीका आ.सतीश चव्हाण यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली आहे.
आ.सतीश चव्हाण यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून मोदी सरकारवर रोष व्यक्त केला आहे.
यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच केंद्र सरकारने १२ लाख टन जी.एम. (जेनेटिकल मॉडिफाइड) सोयाबीन पेंड आयातीला परवानगी दिली. त्यामुळे सोयाबीनच्या किमती या ११ हजारावरून पाच हजार रूपये क्विंटलपर्यंत खाली आल्या आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकांवर अवलंबून आहे. नवीन सोयाबीन बाजारात येण्याच्या काळातच केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयातीचा निर्णय घेतला.
त्यात या सोयाबीन पेंड वरील आयात कर कमी करून केंद्र सरकारने शेतकर्यांच्या जखमेवर मीट चोळण्याचे काम केले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे. हीच आयात जूनमध्ये केली असती तर त्याचा सोयाबीनच्या नव्या हंगामातील किमतीवर परिणाम झाला नसता. मात्र मुठभर लोकांच्या फायद्यासाठी शेतकर्यांना बेहाल करने केंद्र सरकारला चांगलेच जमत असल्याची टीका आ. सतीश चव्हाण यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- ५१ टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा- चंद्रशेखर बावनकुळे
- औरंगाबादच्या सर्व कालव्यांची वहन क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करा, जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ मागणीचं देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत
- ‘मविआ’चे घटक पक्ष म्हणून तिन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवावी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे आवाहन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
