मुंबई : कोरोनाची परिस्थिती पाहता दोन दिवसाचे पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने घेतला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. त्याच बरोबर सत्ताधारी व विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली, विधानसभा अध्यक्षांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप विरोधी पक्षावर करण्यात आला. त्यामुळे सभागृहात संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबन करण्याचा ठराव मांडला व तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. यावरून भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.
या मुद्द्यावर आता महाविकास आघाडी कडून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पलटवार केला आहे. ते म्हणाले की ‘केलेली चूक मान्य करणे, हेच खरे प्रायश्चित आहे. पण त्यासाठी नैतिकता, इच्छाशक्ती असावी लागते. ती भाजपकडे नाही म्हणून लोकशाहीच्या नावाखाली ‘स्टंट’बाजी करून ते आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार चुकीचा तसेच लोकशाहीच्या व विधीमंडळाच्या प्रतिष्ठेला तडा देणारा आहे.’
केलेली चूक मान्य करणे, हेच खरे प्रायश्चित आहे. पण त्यासाठी नैतिकता, इच्छाशक्ती असावी लागते. ती भाजपकडे नाही म्हणून लोकशाहीच्या नावाखाली 'स्टंट'बाजी करून ते आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार चुकीचा तसेच लोकशाहीच्या व विधीमंडळाच्या प्रतिष्ठेला तडा देणारा आहे.
— Ashok Chavan (@AshokChavan1958) July 6, 2021
सत्ताधारी महाविकास आघडीच्या वतीने भाजपवर शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, भाजपने असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा केला आहे. यावरही अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपच्या वतीने करण्यात आलेले दावेही फेटाळण्यात आले आहे. ते म्हणाले की, ‘भास्कर जाधव यांनी त्यांच्यावर औढवलेली परिस्थिती सांगितली तेव्हा विरोधी पक्षनेतेही सभागृहात उपस्थित होते. परंतु, त्यावेळी त्यांनी तालिकाध्यक्षांच्या विधानाच्या सत्यतेबाबत कोणताही आक्षेप नोंदवला नाही. याचाच अर्थ भास्कर जाधव बोलले ते खरे होते, असे ध्वनीत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंची फडणवीसांवर खोचक टीका
- ‘कालचा प्रकार पाहून मी अवाक् झालो, शरमेने मान खाली गेली’
- कोरोनाची लाट ओसरताच देशातील अर्थव्यवस्था पुन्हा येऊ लागली पूर्वपदावर
- भाविकांना दिलासा! श्री गंगानगर-हुजूर साहिब नांदेड विशेष रेल्वे पुन्हा सुरू होणार
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य


