ठाणे : राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र पुणे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, ठाणे या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. दुसरीकडं, वेळीच राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर अटकाव घालण्यासाठी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. राज्यासह देशभरात १६ जानेवारी पासून कोरोना लसीकरण सुरु करण्यात आलं. यासाठी नोंदणी आवश्यक असते.
मात्र, एकही ठिकाणी काळा बाजार, फसवणूक सुरु असल्याचं दिसून आलं. तर काही ठिकाणी चक्क कोरोना लसीच्या बॉटल्सच गहाळ झाल्या. लसीकरणासाठी शासनाने प्राधान्यक्रम ठरवला आहे. आता हे सर्व नियम तोडून ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नियमांच्या बाहेर जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली आहे.
महाराष्ट्रात कोरोना लशीचा काळाबाजार चालला आहे की काय?
सत्तेच्या जोरावर नोंदणीपुर्व लस मिळते की काय?#ठाणे_तिथे_काय_उणे— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) February 26, 2021
ही धक्कादायक माहिती समोर येताच भाजपने शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपच्या अवधूत वाघ यांनी देखील शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘महाराष्ट्रात कोरोना लशीचा काळाबाजार चालला आहे की काय? सत्तेच्या जोरावर नोंदणीपुर्व लस मिळते की काय?’ असे सवाल अवधूत वाघ यांनी केले आहेत. भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी, ‘हे अत्यंत संतापजनक असून पूर्णत: बेकायदेशीर आहे, यातून शिवसेनेची मानसिकता काय आहे याचा हा ढळढळीत पुरावा आहे,’ अशी घणाघाती टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हिंमत असेल तर अमेय खोपकरना अटक करून दाखवाच; मनसेचं आव्हान
- आजही राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आठ हजारांपारच; राजेश टोपेंनी दिली माहिती
- मोदी-शहांच्या सोयीसाठी ‘टप्प्यात कार्यक्रम’ ठरवला का?, ममतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
- प्रतिष्ठा पणाला…पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं; आठ टप्प्यांत होणार निवडणूक
- मोठी बातमी : राज्य बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर


