पुणे : राज्यात गढूळ राजकारण पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडत राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडावी, अशी मागणी शिंदे गटातील आमदार करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनतून हकालपट्टी झालेले रामदास कदम यांनी शरद पवार आणि अजित पवार यांनी शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ने जोरदार प्रत्युउत्तर दिले आहे.
रामदास कदम यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी बंड खोर नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. बंडखोर शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी ही शिवसेना फोडली. स्वतःची कृती योग्य आहे, असे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वर खापर फोडले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी चांगल्या पद्धतीचा कारभार केला होता. खंबीरपने आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. २०१९ चा राग घेऊन भाजपने पोलीस बळाचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करून शिवसेना फोडली, असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी देखील शिंदे गटाला सुनावले आहे. “शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की आलेच शरद पवार साहेबांना मध्ये घ्यायला. बाबांनो तुमचे काम, तुमचे वाद स्वतःच्या हिंमतीवर करा. कशाला तुमचे खापर शरदजी पवार साहेबांवर फोडता. सत्तापिपासूमुळे वाण नाही पण गुण लागला वाटत तुम्हाला,” असे ट्वीट रुपाली पाटील यांनी केले आहे.
काय म्हणाले होते रामदास कदम –
रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी डाव साधला. संधी पाहून त्यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे, त्याच्या जोरावर त्यांनी देखील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचे रामदास कदम म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- VIDEO | “साजना तुझ्याविणा सुणे…”; ‘केसरीया’चं मराठी व्हर्जन ऐकलं का?
- Devendra Fadnavis :पूरातील शेवटच्या माणसाचा बचाव होईपर्यंत बचावकार्य सुरू राहणार – देवेंद्र फडणवीस
- Sanjay Raut | “महाराष्ट्रातील जनता पुरात मात्र मुख्यमंत्री शिंदे सरकारला वाचवण्यासाठी दिल्लीत” ; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
- Ramdas Kadam : पक्ष संपला तरी चालेल, पण उद्धव ठाकरे पवारांसोबतच आहेत, हे का होतंय?; रामदास कदमांचा सवाल
- Sanjay Raut : लढाई कोणतीही असू द्या, आम्ही दोन हात करायला तयार – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

