Share

‘बिहारमध्ये नितीशकुमार नव्हे, तर भाजपचा होणार मुख्यमंत्री’

Published On: 

पाटणा- बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. बिहारच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. सत्तेचे सिंहासन मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष चांगलाच जोर लावत आहेत.रोज नवे आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

बिहारच्या कैमूर जिल्ह्यात घेतलेल्या सभेत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केलं.बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जाहीर सभेत पाकिस्तान आणि ओवेसीचं नाव घेतलं जातंय. बिहारमध्ये आता भाजपला ओवैसी दिसत आहेत, अशी टीका त्यांनी केली. ‘मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात भाजप कट रचत आहे. त्यांना निवृत्त करून भाजप आमदाराला बिहारचा मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू आहे’, असा आरोप ओवैसी यांनी केलाय.

‘बिहारमधील जनता महायुतीच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात भरडली गेली आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारकिर्दीत अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. ते गरीबीत ढकलले गेले आहेत. उपेंद्र कुशवाह यांना मुख्यमंत्री बनवा तरच बिहारच्या जनतेला न्याय मिळेल’असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!