मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज तीन कृषी कायदे (Farm Law) मागे घेण्याची घोषणा केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. आम्ही शेतकऱ्यांना कृषी कायदे समजाऊन सांगण्यात कमी पडलो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी देखील मागितली आहे. त्याच सोबत सर्व शेतकऱ्यांना आता परत घरी जाण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. मात्र शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्याची घोषणा केल्यानंतर या कायद्यांना प्रचंड विरोध झाला. शेतकरी संघटनांनी हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लेच्या सीमेवर ठिया मांडला होता. अनेक स्तरांवरून या कायद्यांना विरोध करण्यात येत होता. मात्र आता शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक काळ सुरू न ठेवता यावर तोडगा म्हणून अखेर मोदी सरकारने हे तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा मोठा निर्णय आज घेतला.
दरम्यान, हे तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा जरी करण्यात आली असली तरी देखील जोपर्यंत याचा निर्णय संसदेत होत नाही तोपर्यंत या घोषणेला काही अर्थ नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे. मात्र हे कायदे संसदेत मागे घेतल्या गेले तरच त्याला अर्थ आहे. दुसरे असे की याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांची याचिका आहे.
महत्वाच्या बातम्या:
- विक्रम गोखलेंनी पुन्हा एकदा केले नरेंद्र मोदी आणि भाजपचं कौतुक, म्हणाले…
- एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर विराट कोहली भावुक; म्हणाला…
- झाल्टा फाटा ते महानुभव चौकातले खड्डे बुजवा; जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या सूचना!
- अन्नदात्यांना देशद्रोही, खलिस्तानी म्हटल्याबद्दल मोदींनी माफी मागावी; कॉंग्रेसची मागणी
- शरद पवारांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचं सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

