पुणे – काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात महत्वाचं विधान केलं होतं. ‘एकत्र आले तर भावी सहकारी’ असं विधान करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिलं. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एका बाजूला सेना-भाजप पुन्हा जवळ येण्याची शक्यता वर्तविली जात असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आता भाजपला खिंडार पाडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
भारतीय जनता पक्षातील काही आमदार हे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे काही आमदार हे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
विशेष म्हणजे शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला मोठं खिंडार पाडण्याची तयारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. भाजपच्या काही आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात असून पुढील आठवड्यात हा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्हिटी दर हळूहळू वाढत आहे’, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, काहीही चमत्कार होऊ शकतो – विखे
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरु आहेत उपचार
- पंजाब कॉंग्रेसमध्ये भूकंप; नेतृत्वाच्या बदलाच्या चर्चांना आले उधाण
- दिवाळीपूर्वीच अनिल देशमुख तुरुंगात जाणार आणि नंतर…; किरीट सोमय्यांचा गंभीर दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

