पुणे : बैलगाडा शर्यतीवरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलेले आहे. केंद्र आणि राज्य सरकार या शर्यतीवरून एकमेकांकडे बोट करत आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. अनेक ठिकाणी आंदोलने, मेळावे घेतले जात आहेत. या दरम्यान, भाजप आ. गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यात बैलगाडा शर्यत भरवत राजकीय धुरळा उडवून दिला. मात्र, त्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पडळकर यांच्यासह ४१ जणांवर सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा मालकांवर विविध पोलिस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. गुन्हे मागे घेतले जातात म्हणून कोणी कायदा हातात घेऊ नये. कायदा, सुव्यवस्था व शांतता टिकवण्याचे काम सर्वांनी करावे. या पुढच्या काळात नव्याने गुन्हे दाखल होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहन दिलीप वळसे पाटलांनी केलेय.
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचा विषय काढला. यावेळी वळसे पाटील म्हणाले, ‘बैलगाडा शर्यती सुरु होण्याबाबत कोणीही राजकारण करू नये. सर्व पक्ष व नेते यांचा बैलगाडा शर्यतींना पाठिंबा आहे. राज्य व केंद्र सरकारही आपल्या बरोबरच आहे. सर्वोच्च न्यायालयात असलेली सुनावणी व निर्णय झाल्याशिवाय बैलगाडा शर्यतचा प्रश्न सुटणार नाही. त्यापूर्वी केंद्र सरकारने संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बैलाला वगळले पाहिजे. सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे तातडीने सुनावणी होण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने अर्जही दाखल केला आहे अशी माहिती त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- खळबळ! ‘उपमुख्यमंत्री अजित पवार निधीसाठी साथ देत नाहीत’, काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
- अफगाणिस्तानातील भारतीयांना वाचविण्यासाठी अमेरिकेने घेतला ‘हा’ निर्णय
- नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

