मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना काही वेळापूर्वी सीबीआयने ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. वरळी मधून त्यांना ताब्यात घेतले असल्याची सध्या प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु त्यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती नसल्याने त्यांनी गौरव चतुर्वेदी यांचे अपहरण करण्यात आले असल्याची तक्रार त्यांनी वरळीतील पोलीस चौकीमध्ये धाव घेतली होती.
वरळीतील सी फेस परिसरात त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार देशमुख कुटुंबियांनी सीबीआयवर जाणून बुजून अडचणीत आण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप केला असल्याचे समजत आहे. गौरव चतुर्वेदी यांना ताब्यात घेण्याच्या अगोदर त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा कोतेही समन्स सीबीआय कडून देण्यात आले नव्हते. असे देखील त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.
अनिल देशमुख प्रकरणात यापूर्वी गौरव चतुर्वेदी यांचं नाव यापूर्वी कधीही आलं नव्हतं. मात्र, आता अचानक त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गौरव चतुर्वेदी हे देशमुख यांच्या वरळी इथल्या सुखदा इमारत इथं आले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर वरळी परिसरातच सी-लिंक जवळ त्यांची गाडी थांबवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी सीबीआयच्या एकूण 10 जणांच्या टीमनं ही कारवाई केली असल्याची माहिती सध्या मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अक्षय बोऱ्हाडे पुन्हा वादात; गॅस वितरकाला खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- रिलायन्स जिओचे खास प्लॅन्स; Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळणार मोफत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

