मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. १०० कोटी रुपये खंडणी घोटाळ्यात ईडीने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता देशमुख यांना विदेशात जाता येणार नाही. ‘महाराष्ट्र टाईम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे.
सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासान्वये ‘ईडी’नेसुद्धा पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गत ‘ईडी’ने आतपर्यंत पाच वेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता सहावे समन्सदेखील बजावण्याची तयारी ‘ईडी’ने केली आहे, पण त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे.
‘ईडी’तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्याखेरीज देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे. जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाईल.’
दरम्यान, सीबीआय पाठोपाठ आता ईडीकडून चौकशीची टांगती तलवार अनिल देशमुख यांच्यावर आहे. ईडी कारवाईविरोधात अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. दुसऱ्या खंडपीठासमोर दाद मागण्याचे न्यायमूर्ती रेवती मोहिते- ढेरे यांनी निर्देश दिले आहेत. अनिल देशमुख अद्यापही ईडीच्या चौकशीला सामोरे गेलेले नाहीत. या सर्व प्रकरणाविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने आता त्यांचं प्रकरण दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘करुणा शर्मा यांच्याबाबत मजकूर प्रकाशित केल्यास हायकोर्टाचा अवमान’, धनंजय मुंडेंच्या वकिलाचे माध्यमांना पत्र
- ‘मुख्यमंत्र्यांच्या घरातील दोघे पॉझिटिव्ह; अन् बेअक्कल संज्या म्हणतो पापी लोकांनाच कोरोना होतो’
- ‘तुमच्या कार्यक्रमांना गर्दी चालते, फक्त गणेशोत्सवालाच नको; ही कसली पद्धत?’ राज ठाकरेंचा हल्लाबोल
- ‘ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर करून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घाट’, राज ठाकरेंचा आरोप
- पडळकरांचे वडेट्टीवारांना ‘उद्धव ठाकरे स्टाईल’ पत्र, सहा वेळा ‘किंबहुना’ शब्दाचा वापर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

