🕒 1 min read
पंढरपूर : वारकरी परंपरेमध्ये ‘आषाढी, कार्तिकी विसरुनका मज, सांगतसे गुज पांडुरंग’, या उक्तिप्रमाणे वारकरी संप्रदायात वारी नित्य नियमाला महत्व आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांनी सर्व उत्सव शासन सूचनांचे पालन साजरी केले. कोरोना महामारीत वारकरी संप्रदयाने शासनाला सहकार्य केले.
परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने शासनाने बाजारपेठा, एस.टी. बसेस , चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या कार्तिकी वारीला पारंपारिक दिंडी व पालख्या घेऊन येण्यासाठी ५० भाविकांना सर्व नियम लागू करुन परवानगी देण्यात यावी, दिंडीला पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा करण्यात परवानगी द्यावी, आळंदी येथील समाधी सोहळा, नगर प्रदक्षणा व पारंपारिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी.तसेच पंढरपूर ते आळंदी पायी जाणाऱ्या दिंडीला ५० भाविकांची परवानगी द्यावी. यांसह विविध मागण्यांसाठी विठ्ठल मंदिरासमोर नामदेव पायरी येथे भजन आंदोलन करण्यात आले.
यावेळी वारकऱ्यांनी कार्तिकी यात्रेस परवानगी द्यावी. यावेळी वारकरी संप्रदाय शासनाचे सर्व नियमांचे पालन करतील. जर शासनाने कार्तिक वारीत अडथळा निर्माण केल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भाविक वारकरी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कमाल झाली ! अर्णब गोस्वामीच्या सुटकेसाठी राम कदमांच्या पायी वाऱ्या सुरूच…
- ‘आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईककुटुंबाला सहानुभूती दाखवायला हवी होती’
- राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याने कोरोनाला केलं चीतपट !
- #BoycottAmazon: अॅमेझॉन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, का व्यक्त केला जातोय संताप?
- काँग्रेसच्या जागा वाढतील माणिकराव ठाकरेंना भाबडी आशा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
