विरेश आंधळकर: सोलापूर जिल्ह्य बँकेच्या ताब्यात असणारा बार्शी तालुक्यातील आर्यन साखर कारखाना चालवण्यास घेणार असल्याचं जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून सावंत यांच्याकडून ‘आर्यन’ला पुनरुज्जीवन मिळणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
थकीत कर्जामुळे आर्यन कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेने घेतला आहे. २०१४ मध्ये हा कारखाना रीतसर पद्धतीने भोसले – नलावडे यांच्या कुमुद शुगरकडे हस्तांतरित करण्यात आला होता. साखर आयुक्तांकडून गाळपाची परवानगी घेत कुमुदाकडून गळीत हंगाम चालवण्यात आला. मात्र पुढे शेतकऱ्यांची देणी व थकीत कर्जामुळे सोलापूर जिल्हा बँकेने कारखान्याचा ताबा घेतला होता.
साखर उद्योगातील अडचणीमुळे कारखाना बंद आहे. हजारो शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा कारखाना चालवण्यास घेणार असल्याचं तानाजी सावंत यांनी सागितले आहे. दरम्यान, या संदर्भात भैरवनाथ शुगरकडून जिल्हा बँकेशी सकारात्मक चर्चा सुरु असून लवकरच हस्तांतरन होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
फक्त मतांसाठी पाकिस्तान विरुद्ध बोलणाऱ्या मोदींचे बेगडी देशप्रेम : धनंजय मुंडे
सरकारचं चाळीस हजार कोटी रुपयांचं नुकसान म्हाडाच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
परंडा विधानसभा मतदारसंघासाठी रासपचा आग्रह – महादेव जानकर
हवी तेवढी माणसे मारा,निवडून येणार आम्हीच दुबारा…, डोंगरी दुर्घटनेवरून सचिन सावतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

