मुंबई : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. दर, आता अर्धा पावसाळा उलटल्यानंतरही मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाची देखील प्रतीक्षा आहे.
काही ठिकाणी अतिपाऊस तर काही ठिकाणी दुष्काळ अशी विषम स्थिती निर्माण झाली असून दोन्ही भागातील शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर हा कमी झाला होता. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा जोर धरला असून आता १९ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसल्याण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. तसेच राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी लागणार आहे.
दरम्यान, आज आणि उद्या मुंबई हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी राज्यातील पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. विदर्भ आणि नाशिकची उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, १९ ऑगस्टनंतर पावसाचा जोर उतरेल असं देखील हवामान विभागाने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार देशाचे माननीय नेते, त्यांच्यावर आपण काय टीका करणार – राज्यपाल कोश्यारी
- ‘आमच्या काळात बैलगाडी शर्यतीसंदर्भात कायदा केला होता, पण या सरकारने…’
- ‘मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी…’; ओवैसींचे खुलं आव्हान
- ‘चंद्रकांतदादा, तुमचं जेवढं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द’; चाकणकरांचा टोला
- भारतीय हवाई दलाची कामगिरी : अफगाणिस्तानात अडकलेले १२० भारतीय आले मायदेशी


