सातारा : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यामुळे राज्यभरात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. आषाढी, कार्तिकी, माघी यात्रेनंतर आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळ्यासाठी देखील भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, ‘कोरोनाच्या बाबतीत सरकार दहशत तयार करुन फसवत आहे. त्यामुळे पुण्यातील देहू येथे होत असलेल्या तुकोबारायांचा बीजोत्सव आणि पैठणच्या यात्रेला सर्व वारकऱ्यांनी जमावे,’ असं आवाहन वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, ‘कोरोनाच प्रसार वाढत नाही तर तसं भासवलं जातंय. सर्दी पडसे झाले की कोरोनाचा रिपोर्ट येतो. केवळ वारकरी संप्रदयाचे उत्सव आणि यात्रा ह्या आणि गेल्या वर्षभरात भरु दिल्या नाहीत. आता, देहूतील उत्सवाला दहा हजार वारकऱ्यांना परवानगी द्यावी. सरकारची चाकोरी तोडून आम्ही सर्व वारकरी जमणार आहोत. देहू आणि पैठणची यात्रा भरली पाहिजे, याबाबत आम्ही ठाम आहोत,’ असं बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपस्थित करण्यात आलेल्या शंकेची परमबीर सिंग यांनी हवाच काढली
- जोपर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजप आंदोलन करणार : फडणवीस
- ‘काँग्रेसचा चप्पल उचल्या प्रवक्ता सचिन सावंत जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही’
- ‘चौकशा कसल्या करताय, हकालपट्टी करा अनिल देशमुखांची’
- आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा सुरु आहे,देशमुखांचा राजीनामा घेतलाच पाहिजे – पाटील


