Share

“भाजपला निवडणुकीत केजरीवालांचा पराभव करता आला नाही म्हणून…”, ‘त्या’ घटनेवरून ‘आप’ चा संताप

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी भाजप नेते तेजस्वी सूर्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजस्वी सूर्या आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह भाजप कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेथे पोहोचले होते. यावरच आता दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“भाजपला केजरीवाल यांना मारायचे आहे. भारतीय जनता पक्षाच्या गुंडांना पोलिसांसह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी नेण्यात आले. त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. बूम बैरियर तोडून सर्व काही पोलिसांच्या उपस्थितीत घडले. हे सर्व भाजपच्या गुंडांनी केले आहे. भाजप अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत हरवू शकत नाही, म्हणून भाजप त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. ही अतिशय विचारपूर्वक केलेली योजना आहे.” ,असे दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान आंदोलनादरम्यान केजरीवाल यांच्या घराच्या गेटलाही भगवा रंग देण्यात आला होता. याबाबत भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी म्हटले की, “त्यांना केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांसोबत कसा नरसंहार झाला याची आठवण करून द्यायची होती. त्यामुळे ते आज रस्त्यावर उतरले आहेत.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!