Share

‘खबरदारी घ्या, अन्यथा परिस्थितीबाहेर जाईल’, आ.संजय राठोड यांचा इशारा

Published On: 

यवतमाळ : काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आ.संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या काळी मीडियापासून दूर राहणारे राठोड आता कोरोना काळात सक्रिय झाले आहेत. कोरोना संसर्गासह मृतांची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आताच खबरदारी घेतली नाही, तर जिल्हा हाताबाहेर जाईल, असा इशारा आमदार संजय राठोड यांनी दिला.

आ.राठोड म्हणाले, जिल्ह्यात दररोज किमान १० हजार कोरोना चाचण्या करण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र, येथे प्रतिदिन चार हजार ५०० पेक्षाही कमी चाचण्या होत आहे. बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गांभीर्याने होणे गरजेचे आहे. ही यंत्रणा कुठेच कार्यान्वित नसल्याचा आरोप आमदार राठोड यांनी केला.

दररोज किमान एक हजार बाधित रुग्ण आढळत असून, २० ते २५ रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. सध्या बाधित व मृतांचा दर २५ टक्क्यांवर गेला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे ते बोलताना म्हणाले. प्रशासनही त्याबाबत उदासीन असल्याने कोरोनाने बाधित होणाऱ्या व मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या भयावह स्थितीत असू शकते, अशी चिंता संजय राठोड यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!