Share

बीसीसीआयने ऐनवेळी कसोटी क्रिकेट सामन्याचे ठिकाण बदलले

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : दिनांक ६ फेब्रुवारी पासून वेस्टइंडीज भारत दौऱ्यावर येणार आहे. या वेस्टइंडीजच्या भारत दौऱ्यात ३ एकदिवसीय तसेच ३ टी-२० सामने होणार आहेत. हे ६ मर्यादित षटकांचे सामने अहमदाबाद आणि कोलकत्ता या शहरात आयोजित करण्यात येणार आहेत. कोलकत्ता शहरात टी-२० सामन्यांच आयोजन झाल्यावर श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर कसोटी आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळायला येणार आहे. मात्र बीसीसीआयने  या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकात बदल केला आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकेची तयारी करत आहे.

या वेस्टइंडीज दौऱ्यानंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर कसोटी आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळायला येणार आहे. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती.मात्र आता त्याच्या वेळापत्रकात बीसीसीआय तर्फे बदल करण्यात आला आहे. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून कसोटी मालिका सुरू होण्याआधी भारत आणि लंका यांच्यात टी-२० मालिका होणार आहे.

दोन्ही संघातील पहिली कसोटी ४ ते ८ मार्च रोजी होणार असून ती बेंगळुरू ऐवजी मोहाली येथे खेळवली जाणार आहे.  त्यामुळे विराट त्याची १००वी कसोटी मोहाली मैदानावर खेळले. अर्थात या गोष्टीची अधिकृत घोषणा अद्याप बीसीसीआयकडून झालेली नाही. भारतात सध्या सतत वाढणाऱ्या कोरोना महामारीमुळे बीसीसीआयने बेंगळुरू येथील कसोटी सामना मोहाली येथे हलवला आहे.\

     महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!