Share

‘न्यूझीलंड संघावर दबाव आणायचा असेल तर फलंदाजीत सुधारणा हवी’

Published On: 

इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला असून दुसऱ्या डावात फलंदाजी करत दिवसाखेर भारताची स्थिती 30 ओव्हरमध्ये 64/2 अशी होती. दिवसाखेर भारताने किवी संघाविरुद्ध 32 धावांची आघाडी घेतली.

आता या सामन्याचा पाचवा दिवस सुरु असला तरी पावसामुळे हा सामना आणखी एक दिवस खेळला जाणार आहे. आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. भारतीय संघाने पाचव्या आणि सहाव्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करणे आवश्यक आहे. असे मत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्विट करून सांगितले आहे.

ट्विट करत सचिन म्हणाला, ‘मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांनी उत्तम  गोलंदाजी केली. भारताने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत गोलंदाजांना चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून विल्यमसनच्या साथीने जेमिसन आणि साऊथी यांनी महत्त्वाच्या धावा केल्या. या सामन्यात आता साधारण १३० षटकांचा खेळ शिल्लक असून न्यूझीलंडवर दबाव टाकण्यासाठी भारताने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करणे गरजेचे आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!