इंग्लंड : आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमानमध्ये आयोजित केले जाणार आहे. आता हा मेगा इव्हेंट सुरू होण्यास फक्त दीड महिना शिल्लक आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संघांची घोषणा 10 सप्टेंबरपर्यंत केली जाणारा आहे. तर काही संघांची घोषणाही करण्यात आली आहे. दरम्यान, बांगलादेश संघाचा सलामीवीर तमीम इक्बालने टी -20 विश्वचषकासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
तमीम इक्बालने टी -20 विश्वचषक न खेळण्याचा निर्णय घेतला आहे आणि संघातून त्याचे नाव मागे घेतले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) लवकरच टी -20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा करणार आहे, ज्यात तमिम इक्बाल भाग घेणार नाही, कारण त्याने स्वतः या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने यामागील कारण असे दिले आहे की, तो पूर्वी टी -20 क्रिकेट खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत, त्याला त्या व्यक्तीची जागा घ्यायची नाही जाणे पूर्वी बांगलादेशसाठी चांगले क्रिकेट खेळले आहे.
तमीम इक्बालने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने असे म्हंटले आहे की, ‘मी शेवटचे 15 ते 20 टी -20 सामने खेळलो नाही आणि मी ज्याची जागा घेईल, मला वाटत नाही की मी त्याच्यासाठी योग्य असेल.’
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना नियमावलीचं पालन करत तामिळनाडूसह दिल्लीमधील शाळा होणार सुरु
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- गांधी परिवाराची बदनामी करणारा व्हिडिओ केल्याप्रकरणी पायल रोहतगी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

