Share

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा सातत्यानं प्रयत्न होत आहे – बाळासाहेब थोरात

Published On: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंठपीठानं मराठा आरक्षण खटला पाच सदस्यीय खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय देताना आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं राज्यात मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे राज्य सरकारनं यासंर्दभात बैठक घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्व पक्षीयांना सोबत घेऊन पुढील दिशा ठरणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्या करिता राज्य सरकार सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्यानं होत आहे, ही वस्तूस्थिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला सामोर जावं लागणार आहे. सध्या राजकारण न करता हा मराठा आरक्षण मुद्दा हाताळायचा आहे.

काही विषय महाराष्ट्रातले दोन्ही पक्षांनी मिळून सोडवले पाहिजेत त्यातील मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे. असं राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मत मांडलं. तर कंगणा मुंबईला सोनिया सेना म्हणाली, त्यावर विचारलं असता या विषयावर न बोल्लेलचं चांगलं आहे. असं उत्तर बाळासाहेब थोरात यांनी दिलं.

पहा काय म्हणाले बाळासाहेब थोरात :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/336461044358786/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!