Share

राज्यात पुन्हा आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नये – बाळासाहेब थोरात

Published On: 

अहमदनगर : नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेत तुम्ही आघाडी किंवा युती होणार का याची चिंता करु नका. पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा असं सांगितलं. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

या शक्यतेवर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धवजी यांनी नेमंक काय सांगितलं आहे हे मला माहिती नाही. पण मी इतकं सांगू इच्छितो की, मध्यावधी निवडणुका घेण्याचा विचार हे सरकार करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे लोकांमध्ये सरकारबाबत इतकी नाराजी आहे की जर निवडणूक झाली तर हे सरकारचं धाराशाही होईल.’ असं फडणवीस म्हणाले आहेत.

यावर आता महसूलमंत्री आणि कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘फडणवीसांची नेहमी काही ना काही घोषणा असते पण ती प्रत्यक्षात उतरत नाही. मध्यावर्ती निवडणुका होणार नाहीत. दोन वर्ष आघाडी सरकार चाललंय आणखी तीन वर्ष चालेल पुन्हा आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नये’ असे थोरात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!