अहमदनगर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्या नंतर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांच्या ऐवजी डॉ. भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. काल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. तरीही त्यांचे समर्थक मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावरून संताप व्यक्त करत राजीनामे देत आहेत. बीड जिल्हातून सुरु झालेले राजीनामा सत्राचे लोण आता अहमदनगर जिल्ह्यात देखील पसरले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे. अहमदनगरमध्येही दोघांनी राजीनामे दिला आहे. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी सुद्धा आपल्या राजीनामा दिल्याचं समजतंय. या दोघांनीही भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत.
दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्राची दखल केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. याविषयीच बोलण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे या तातडीने दिल्लीला रवाना झाल्या आहेत. दिल्लीत त्या पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या दिल्ली भेटीतून नाराजीवर उपाय निघणार की मुंडे काही मोठा निर्णय घेणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
पंकजा यांच्या 49 समर्थकांनी विविध पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंकजा यांनी समर्थकांची मुंबईत बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी ही बैठक होणार असल्याचं भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले. त्यामुळे पंकजा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नानाजी काय तुमची अवस्था?…ना सत्तेत काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला’
- पद्म पुरस्कारांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत नामांकन पाठवा; मोदींचे देशवासियांना आवाहन
- जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले तारेचे कुंपन मनपा आयुक्तांनी हटवले, दोघांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर
- ‘या’ अभिनेत्रीमुळे हर्षवर्धन कपूरच्या हातातुन निसटला हॉलिवूडपट, स्वत:च केला खुलासा
- …तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरता येणार नाही, वारकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा


