मुंबई : २०१९ विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत हातमिळवणी केली. या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली असून सर्वाधिक जागा मिळवून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. हे तीन भिन्न विचारांचं सरकार असून फार काळ टिकणार नाही असं भाकीत अनेकदा भाजप नेत्यांनी केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली असून विविध नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी एका दिवसात ते तब्बल ६ प्रचारसभा घेतल्या.
‘कमळाचं बटन दाबून समाधान आवताडेंना विधानसभेत पाठवा, बाकीचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,’ असं सूचक विधान करून पुन्हा एकदा सत्तापालटाचा इशारा दिला आहे. आता फडणवीसांच्या या वक्तव्याचा कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी समाचार घेतला आहे. ‘आता देवेंद्रजींबद्दल काय बोलणार, मी पुन्हा येणार म्हणता-म्हणता ते आले नाही आणि अजूनही ते तशीच घोषणा करत आहेत. आपल्या आमदारांचे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा हा प्रकार आहे. असा घणाघात थोरात यांनी केला आहे. मात्र, आघाडी सरकार चालणार आणि पाच वर्ष आम्ही काम करणार. असा विश्वास देखील बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी पुन्हा येईन’च्या चक्करमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे पातक भाजपा करत आहे – लोंढे
- रेमडेसिविर इंजेक्शन 25 हजार रुपयांना विकताना डॉक्टरला केली पोलिसांनी अटक
- तयारी लॉकडाऊनची! उस्मानाबादेत मद्यप्रेमींची दुकानांवर तोबा गर्दी
- गुढी पाडव्यानिमीत्त मुंबई इंडियन्सच्या खास शुभेच्छा
- नंदुरबारमध्ये बिकट परिस्थिती, बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण गुजरातच्या वाटेवर


