🕒 1 min read
जळगाव:- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.
काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत नामांतराला तीव्र विरोध केला आहे. तर, दुसरीकडं CMO अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शासन निर्णय वा इतर माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगपाखड केली होती.
दरम्यान, औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं ही पूर्वीपासूनच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ती आजची घोषणा नाही. कोणत्याही शिवसैनिकांच्या तोंडात औरंगाबाद नावं कधीच आलं नाही तर संभाजीनगरच आलं आहे. संभाजीनगर नाव देणं हे काही चुकीचं नाही. तसेच या विषयावर तीन पक्ष तोडगा काढणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात
- रोहितच्या नादात चाहत्याने काढली अर्धी मिशी; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
- ‘टिवटिव’ कायमची बंद ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरची मोठी कारवाई…
- ‘बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या महाराष्ट्रात लागले नाही’; राऊतांचा मोदींवर घणाघात
- उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचं प्रत्युत्तर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

