Share

भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात

Published On: 

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला आहे. या सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस असून भारताचा पहिला डाव १००.४ षटकात २४४ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय संघ ९४ धावांनी पिछाडीवर पडला आहे.

भारताकडून या डावात शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने अर्धशतके केली. या दोघांनीही प्रत्येकी ५० धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला ५० धावांचा आकडा गाठता आला नाही. त्या दोघांपाठोपाठ रिषभ पंतने सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्याचबरोबर रविंद्र जडेजाने नाबाद २८ धावा केल्या. तसेच भारताचे ३ क्रिकेटपटू धावबाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जॉस हेजलवूडने २ आणि मिशेल स्टार्कने १ विकेट घेतली.

पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर भारताची तळातील फलंदाची गडगडली. पुजारा बाद झाल्यानंतर आर अश्विन ९३ व्या षटकात धावबाद झाला. त्याला पॅट कमिन्स आणि मार्नस लॅब्यूशानेने मिळून धावबाद केले. अश्विनने १० धावा केल्या. तर पदार्पण करणारा नवदीप सैनी ४ धावांवर असताना ९५ व्या षटकात मिशेल स्टार्कच्या चेंडूवर मॅथ्यू वेडकडे झेल देऊन बाद झाला. त्यापाठोपाठ लगेचच ९७ व्या षटकात लॅब्यूशानेने जसप्रीत बुमराहला धावबाद केले. अखेर मोहम्मज सिराजची विकेट कमिन्सच्या गोलंदाजीवर गेल्याने भारताचा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला. सिराज ६ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजा २८ धावांवर नाबाद राहिला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!