Share

‘अशोक चव्हाणांमुळे मराठा समाजावर वाईट वेळ’

Published On: 

औरंगाबाद : मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबतीत सगळीकडे अपयशी ठरले आहेत. त्यांच्यामुळे मराठा समाजावर वाईट वेळ आल्याचा आरोप शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी केला. औरंगाबादेत शिवसंग्राम संघटनेची राज्य कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. यावेळी आ. मेटे यांनी मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकावर जोरदार हल्लाबोल केला.

ते म्हणाले, अशोक चव्हाण आल्यापासून मराठा आरक्षणाबाबत एकही सुनावणी मराठा समाजाच्या बाजूने झाली नाही. त्यांच्या अकर्तृत्वानपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांना बोलावले नाही. त्यांच्याही लक्षात आले हे अकार्यक्षम आहेत. पण सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री त्यांना काढू शकत नाहीत. अशोक चव्हाण यांना किंमतच दिली नाही. त्यामुळे ते माझ्याविरोधात बातम्या पेरत असल्याचा आरोप मेटे यांनी केला.

केंद्र सरकारने याचिका दाखल करुन मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली होती. यावरूनही मेटे यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. हे केंद्राने करायचे तर मग तुम्ही काय खुर्च्या उबवता का? असा सवाल मेटे यांनी अशोक चव्हाण यांना केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!