Share

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. हे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणाचे शेतकरी आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत.केंद्राने कृषी कायदे लागू करण्याआधी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. केंद्र सरकारने हे कायदे लादले आहेत, असा आरोप शेकऱ्यांकडून केला जातोय.

विज्ञान भवन येथे शेतकरी प्रतिनिधीमंडळ आणि कृषिमंत्री यांच्यात चर्चेनंतरही तोडगा निघत नसल्याचं दिसत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी येत्या ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे.दरम्यान, या आंदोलनाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही पाठिंबा दिला आहे.

विशेष म्हणजे पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू दुचाकीद्वारे थेट दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ते अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून शेतकऱ्यांसह दुचाकी, ट्रॅक्टर आणि ट्रकसह दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!