अचलपूर : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली होती.
यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. यासोबतच, भाजप मधील विविध नेत्यांनी देखील खत दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे खतांच्या दरात कपात केल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाल्यानंतरही खताची किंमत अर्ध्याने कमी केली आहे.
खतांच्या किंमती जरी कमी केल्याची घोषणा केली असली तरी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहारच उद्या टाली थाली आंदोलन होणार असल्याची भूमिका घेतली आहे. ‘शेतकरीचा एकजुटीचा विजय, केंद्राने रासायनिक खताची दरवाढ मागे घेतली आहे. भारतात ४२ लाख टनाची आवश्यकता असुन ४५ लाख टन तुर उपलब्ध आहे. आवश्यकतेपेक्षा २ लाख टन तुर उपलब्ध असताना केंद्र सरकारने ६ लाख टन तुर आयात कशासाठी केली? तसेच तुर, मुग, उडीद आयात पुर्णपणे खुली करुन धान्याचे भाव पाडण्यात येणार. याकरीता प्रहारचे टाली थाली आंदोलन केंद्र शासनाच्या तुर, मुग, उडीद या धान्याच्या आयात धोरणावर उद्या होणार आहे,’ अशी भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली आहे.
तसेच तुर, मुग, उडीद आयात पुर्णपणे खुली करुन धान्याचे भाव पाडण्यात येणार.
याकरीता प्रहारचे टाली थाली आंदोलन केंद्र शासनाच्या तुर, मुग, उडीद या धान्याच्या आयात धोरणावर उद्या होणार आहे. (2/2)— BACCHU KADU (@RealBacchuKadu) May 19, 2021
काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
‘केंद्र सरकार शेतकऱ्यांचं जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारभावात वाढ झाल्यानंतरही आम्ही जुन्याच दराने खत देण्याचं ठरवलं आहे. आजच्या निर्णयानंतर DAP खताची एक बॅग २४०० ऐवजी १२०० रुपयांमध्ये मिळेल,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- संकट काही थांबेना ; तौक्ते चक्रीवादळानंतर देशात धडकणार आता नवे ‘यास’ वादळ
- मोदींनी ठरवलच, आता तब्बल ५७ वर्ष जुनी बँक विकणार !
- शेतकऱ्यांच्या दट्ट्याने सरकार आलं वठणीवर; खुद्द मोदींनी खतांच्या किंमतीत घट केल्याचं केलं जाहीर !
- राज्यांमधील अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतींवर काटेकोर लक्ष ठेवा – पीयूष गोयल
- चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक सर्व रुग्णालयांनी दर्शनी भागात लावावा- जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

