Share

शेतकऱ्याचा नादच खुळा! फक्त १८ गुंठ्यांमध्ये काढले २ लाखांचे उत्पन्न

Published On: 

चांदवड : शेतकऱ्यांनी लागवड पद्धती बदलली तर शेतकरी शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवू शकतात. चांदवड तालुक्यातील भरवीर येथील एका शेतकऱ्याला फक्त १८ गुंठ्यात तब्बल २ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

चांदवड तालुक्यातील भरवीर येथील रघुनाथ जाधव या शेतकऱ्याने लागवडीची पारंपारिक पद्धत बदलल्यामुळे त्याने १८ गुंठ्यांमध्ये तब्बल २ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल केली. या शेतकऱ्याने वाफ्या ऐवजी बेड पद्धतीने रताळाची लागवड करून कमाई केली.

१८ गुंठ्यांमध्ये जवळपास १० टनांच्या आसपास उत्पन्न –

एका रताळ्याचे वजन तब्बल साडेसहा ते सात किलो पर्यंत होते. हा माल मनमाड मालेगाव येथील बाजारपेठेत विकला गेला. १८ गुंठ्यांमध्ये जवळपास १० टनांच्या आसपास उत्पन्न मिळाले. याला २ हजार प्रतिक्विंटल वीस रुपये किलोचा दर मिळाला. हा माल महाशिवरात्रीच्या अगोदर विकला गेला. या दिवसात रताळांची सर्वत्र मागणी असते याचा अंदाज घेत रघुनाथ जाधव या शेतकऱ्याने ४ महिने आधी रताळांची लागवड केली होती.

खते आणि खर्च  –

शेणखताचा आणि पोषक विद्राव्य खतांचा वा केला आणि यानंतर फक्त ८ हजारापर्यंत खर्च आला. या पिकाला पूर्ण होण्यासाठी ४ ते ५ महिने लागतात.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!