औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या सलग तीन दिवसांपासून पाच रुग्ण वाढ असलेल्या शहरात शनिवारी अचानक २३ रुग्ण आढळून आले. यामुळे मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे. इतकेच नाही तर ग्रामीण भागातील रुग्ण संख्येतही वाढ दिसून आली. शनिवार ग्रामीण भागात ११ रुग्णांची भर पडली. संभाव्य तिसरी लाट आणि आगामी काळात असलेले सण-उत्सव यामुळे ही आकडेवारी चिंतेत वाढ करणारी आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी १७ जणांना (मनपा ८, ग्रामीण ९) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष ४४ हजार २८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी एकूण ३४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष ४७ हजार ९८३ झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ५२९ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
मनपा परिसरात कोरोना रुग्ण वाढ झाल्याने मनपाची चिंता वाढली आहे. मनपा हद्दीमधील सातारा पोलीस स्टेशन परिसर १, हर्सूल परिसर १२, चिकलठाणा १, महाजन कॉलनी १, बीड बायपास परिसर ३, तापडिया नगर १, कुंभारवाडा परिसर २, होनाजी नगर १, तर शिवाजी नगर भागातील एका रुग्णांची भर पडली आहे. दुसरीकडे औरंगाबाद ग्रामीणमध्ये ४, गंगापूर ४, वैजापूर १ तर पैठण तालुक्यातील २ रुग्णांची भर पडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देशात महाराष्ट्र अग्रेसर ; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या गेली दीड कोटीवर
- ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांवर विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले..
- ..तर पोलिसांनी भाजपा नेत्यांचे मुसक्या आवळाव्यात, कुठलीही दया दाखवू नये-सचिन सावंत
- ‘नेत्यांना पक्षात घेऊन वापरायचे, हेच भाजपचे धोरण’, जयंत पाटलांची टीका
- ‘विमा कंपन्या आणि केंद्र सरकारमध्येच सेटलमेंट’, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

