औरंगाबाद : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एसीडीसीएलने औरंगाबाद महानगरपालिका येथे कार्यरत कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने एकात्मिक म्युनिसिपल ई-गव्हर्नन्स सिस्टम आणि जीआयएस यांचा समावेश असलेला ई-गव्हर्नर्स हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांच्या सध्याच्या प्रगतीविषयी चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि.१९) प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय व एसीडीसीएलचे वरिष्ठ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे आणि एमआयपीएलचे संचालक प्रसाद पाटील यांनी व्याप्ती, टाइमलाइन आणि प्राप्त निविदांचे सादरीकरण केले. या प्रकल्पात एकात्मिक म्युनिसिपल ई गव्हर्नन्स सिस्टम आणि सर्व संबंधित सॉफ्टवेअरची अंमलबजावणी समाविष्ट आहे. जीआयएस आणि सध्याच्या प्रणालींसह एकत्रीकरण क्लाउड बेस्ड डेटा सेंटर आणि आपत्ती पुनर्प्राप्ती सेवांची तरतूद, पेमेंट गेटवेची तरतूद यात समाविष्ट आहे.
तसेच महानगरपालिका मुख्यालय विभागीय कार्यालयांमध्ये नागरिक सुविधा केंद्र (सीएफसी) तयार करणे, सीएफसीमध्ये संरक्षित नेटवर्क स्थापित करणे, वार्षिक देखभाल, सुविधा व्यवस्थापन आणि प्रशिक्षण समर्थन महानगर पालिकेच्या विविध करांची मागणी निर्माण करण्यासाठी व संबंधित संस्थांना पोस्ट, ईमेल, एसएमएस व हँड डिलिव्हरीद्वारे बिले पाठविण्यास पाठिंबा देण्यात आला आहे. यशस्वी निविदाला वर्क ऑर्डर दिल्यानंतर महिन्यांच्या आत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल.
जीआयएस प्रकल्पात पाणीपुरवठा, पथदिवे, विद्युत खांब, रस्ते, गटार इ. कर तपशिलांच्या मोजणीसाठी रिक्त भूखंडांसह सर्व विद्यमान मालमत्तांसाठी मालमत्ता सर्वेक्षण करणे. विविध विभागांकडील तपशिलांचे संग्रहण आणि बेस स्तरांचे अद्ययावत करणे आणि जीआयएस डेटासेट आणि डेटाबेसमध्ये विविध स्तरांचा समावेश यांचा यात समावेश आहे.
दोन्ही प्रकल्पांचे समन्वय व अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त यांनी महानगर पालिका अधिकारी यांना प्रत्येक विभागात नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. महानगरपालिकेच्या महसूल निर्मितीसाठी हे दोन प्रकल्प अतिशय महत्त्वाचे असल्याने प्रकल्प पूर्ण व यशस्वीपणे पार पाडता यावे यासाठी उच्च स्तरावर सहभाग निश्चित केला जावा. अशी सूचना त्यांनी उपस्थित सर्वांना केली.
महत्त्वाच्या बातम्या
- रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मिळणार पण…
- सुशांतच्या बायोपिकवर बंदीसाठी वडील हायकोर्टात मागणी, निर्मात्यांना नोटीस
- मराठा आरक्षण मिळाले नाही तर मराठ्यांचा तांडव रोखूनच दाखवा! साष्टपिंपळगाव मराठा आंदोलकांचा इशारा
- मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांच्या मागणीची तरी दखल घ्यावी-प्रसाद लाड
- पेटणाऱ्या चिता शांत झोप लागू देत नाहीत, त्यामुळे लॉकडाऊन लागणारच – जितेंद्र आव्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

