🕒 1 min read
औरंगाबाद : शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसींचा कमी पुरवठा होत असताना लसीकरणाच्या योग्य नियोजनाअभावी शहरवासीयांचा मोठा छळ होत आहे. अनेक केंद्रावर गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत आहे. त्यातून पुन्हा कोरोनाचा संसर्ग अधिक पसरण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेने योग्य नियोजन करून लसीसाठी नागरिकांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस समीर राजूरकर यांनी बुधवारी (दि.१२) केली.
कोरोना संसर्गास रोखण्यासाठी सरकारकडून लसीकरणाचा पर्याय उपलब्ध होताच महापालिकेने लसीकरण मोहिमेची जोरदार तयारी केली. प्रारंभी लसींचा साठा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने ही मोहीम सुरळीत चालली. मात्र लसीचा पुरवठा कमी झाल्यापासून नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांना उन्हात पाच-पाच तास रांगेत थांबूनही लस मिळत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अनेक केंद्रांवर तर वादावादीचे प्रकारही घडत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
त्यात पालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी नागरिकांचा छळ सुरू असल्याचा आरोप केला आहे. ज्या आरोग्य केंद्रावर गर्दी असते तिथे जास्त लसी का दिल्या जात नाहीत? कोणत्या केंद्रावर किती लसी मिळतील, हे एक दिवस आधीच जाहीर करण्यात यावे. लस नोंदणी केल्यावर मिळेल का, टोकणवरून हे जाहीर करावे. दररोज १५ हजार लसीकरणाचे नियोजन असताना १३ हजार लसी मिळाल्या तरी दोन दिवसांचे नियोजन का केले जाते? लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. रांगेतील काही जण पॉझिटिव्ह असून शकतात, त्यांच्यापासून संसर्ग झाल्यास जबाबदार कोण? असे विविध प्रश्न या निवेदनात उपस्थित केले आहेत.
तीन सेकंदात बुकिंग हाऊसफुल : सरकाने १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविन अॅपवर नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यासाठी रात्री साडेआठ ते दहा अशी नोंदणीची वेळ दिलेली आहे. मात्र या वेबसाइटवर अवघ्या तीन सेकंदात रोजची नोंदणी हाऊसफुल होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत असल्याची वास्तविकता निवेदनात मांडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आ.संजय गायकवाडांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट
- ‘… त्यानंतर मला खूप भीती वाटली’ ; ऋद्धिमानने सांगितल्या कोव्हिड काळातील यातना
- ‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवारांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तू…’
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मिळणार ५ हजारांची पेन्शन,शिक्षणही मिळणार मोफत
- खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट, मनपा व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

