पैठण : तालुक्यातील हिरडपुरी येथे मुबलक प्रमाणात वाळुसाठा नसतांना केवळ कागदावर वाळुसाठा असल्याचा दाखवत तालुका प्रशासनाने या ठिकाणचा वाळुसाठा लिलावाचा घाट घातला आहे. या बद्दल ठेकेदार दबक्या आवाजात लिलाव रद्द करण्याची मागणी करत आहे.
उपविभागीय आधिकारी यांच्याकडून तालुका प्रशासनाला मिळालेल्या आधिकारानुसार तालुका प्रशासनाने शहरातील पोलिस ठाण्यातील एक व हिरडपुरी येथील दोन असे तीन वाळुसाठ्याचे लिलाव नुकतेच केले आहे, हिरडपुरी येथील एक वाळुसाठा ११० ब्रासचा दाखवला तर दुसरा १३० ब्रासचा पण प्रत्यक्षात या ठिकाणी कमी वाळू साठा असल्याची चर्चा आहे. गोदावरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला व गोदाकाठी असे मिळुन एकंदर साठ ते सत्तर ब्रास वाळुसाठा आल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे.
या ठिकाणी जर साठ ते सत्तर ब्रास वाळुसाठा आजच्या तारखेला शिल्लक असेल तर उर्वरीत वाळु ठेकेदाराला देणार कुठून ? असा प्रश्न काही ठेकेदार या ठिकाणी उपस्थीत करीत आहे, वाळुसाठा केवळ कागदावर दाखवण्यात आला असुन प्रत्यक्षात वाळुसाठा हा गंगेतुन उपसला जाणार असल्याची भीती ठेकेदारांनी उपस्थित केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूजा चव्हाण केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत’
- वयाच्या ८८ व्या वर्षी भारताचे ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन करणार भाजपात प्रवेश
- ‘नाना पटोलेंचे ‘ते’ विधान केवळ प्रसिद्धीसाठी’ : फडणवीस
- ‘या’ तारखेला लाँच होणार स्कोडाची पहिली मेड इन इंडिया ‘संस्कृत’ नाव असलेली SUV कार
- अजानच्या आवाजाने अभिनेत्याची उडाली झोप; थेट मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

