मुंबई : राज्यातील शाळा महाविद्यालये २ ऑक्टोबरपासून सुरु होतील असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे, आतातरी ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा बंद होईल अशी अपेक्षा करुया, आता घुमजाव नको. अशी खोचक टीका भातखळकरांनी केली आहे.
गेली दोन वर्षांपासून राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. दरम्यान आता दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्यातील महाविद्यालये २ ऑक्टोबरपर्यंत सुरु केली जाऊ शकतात. विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस आणि शिक्षकांचेही दोन्ही डोस जर पूर्ण झाले असतील, तर याबाबत विचार केला जाऊ शकतो. असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
भातखळकर ट्विटमध्ये म्हणतात, ‘उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील महाविद्यालये २ ऑक्टोबरपासून आणि शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. हा निर्णय अंमलात आणला जाईल, शिक्षणाचा ऑनलाईन खेळखंडोबा बंद होईल अशी अपेक्षा करुया. आता घुमजाव नको.’ अशी खोचक टिका भातखळकरांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील महाविद्यालये २ ऑक्टोबरपासून आणि शाळा दिवाळी नंतर सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.
हा निर्णय अंमलात आणला जाईल, शिक्षणाचा ऑनलाइन खेळखंडोबा बंद होईल अशी अपेक्षा करूया. आता घुमजाव नको. pic.twitter.com/fWNGniP9Gk— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 24, 2021
शाळासाठी मात्र अजून वेळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुलांसाठी अजून डोस घेण्याचे नियोजन आखणे सुरु आहे. त्यामुळे येत्या २ ऑक्टोबरपर्यंत जर परिस्थिती आटोक्यात येण्याचे संकेत दिसले तर लवकरच शाळा सुरु केल्या जातील, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राहत्या घरी कोंडल, प्रवासात आडकाठी आणली; सोमय्या करणार उद्या मुंबई पोलिसांविरोधात तक्रार
- ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले- छगन भुजबळ
- आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत असतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र..; हेमंत ढोमेची हळहळ
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लातूर जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- लातूरमध्ये क्रीडा केंद्र उभारा, आमदार संभाजी पाटील निलंगेकरांची केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

