Share

राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले,’सत्तेसाठी हिंदुत्वाचे नेसण सोडणाऱ्यांना…’

Published On: 

मुंबई : अयोध्येतील बाबरी मशिद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर काल ६ डिसेंबरचेच औचित्य साधून, शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांनी बाबरी मशिदसंदर्भात एक ट्विट केले. अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन, असे नार्वेकर ट्विटमध्ये म्हणले होते. त्यानंतर या ट्विटवरुन राजकीय वर्तुळात नवा वाद सुरु झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

तसेच याविषयी प्रतिक्रिया देत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते की,’काही गोष्टी विसरायला हव्यात, अध्याय संपला आहे. राम मंदिर उभं राहतंय. देश एक रहावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’

दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यावर भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले असून यासंदर्भात ट्विट करत ते म्हणले आहेत की,”बाबरी विध्वंसाचा अध्याय संपला’,’काही गोष्टी विसरायच्या असतात’ असा सल्ला संजय राऊतांनी मिलिंद नार्वेकरांना दिला आहे. सत्तेसाठी कमरेचे हिंदुत्वाचे नेसण सोडणाऱ्यांना नार्वेकरांच्या ट्विट मुळे अल्पसंख्याक मतांची नवी सोयरीक तुटण्याची भीती वाटली असावी’, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!